Maharashtra Havaman Andaj : नगरकरांनो काळजी घ्या ! आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस…

जोरदार पाऊस
जोरदार पाऊस

Maharashtra Havaman Andaj आज आणि उद्या अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील बहुतांश भागां मध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे. तसेच 25 सप्टेंबरला जिल्ह्या-तील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार अशी शक्यता असून या पार्श्व-भूमीवर अहमदनगर जिल्ह्या साठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Ahmednagar Weather Update : अहमदनगर (अहिल्यानगर)शहरातील नागरिकां साठी तसेच शेतकऱ्यां साठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून ती बातमी आहे पावसा संदर्भात. भारतीय हवामान खात्याने अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून सुट्टीवर असल्लेला पाऊस परत एकदा सक्रिय झाला असून गेल्या दोन दिवसां मध्ये राज्या तील विविध जिल्ह्यां मध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज पासून राज्यातील पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज दिला आहे. राज्यात जवळ-पास 27 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसाचा जोर हा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रा तील काही भागात अधिक राहणार असे हवामान खात्याने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.

आज आणि उद्या अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील बहुतांश भागां मध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे. तसेच 25 सप्टेंबरला जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार अशी शक्यता असून या पार्श्वभूमी वर अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने सांगितल्या प्रमाणे उत्तर महाराष्ट्रा तील नाशिक, अहमदनगर आणि पुण्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला तर यामुळे जिल्‍ह्यातील भीमा व घोड नदी, गोदावरी नदी तसेच प्रवरा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्‍या विसर्गा मुळे नद्यांच्‍या पाणी-पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

यामुळे या नदी काठी वसणाऱ्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली तर नदी काठी असणाऱ्या लोकांचे नुकसान होण्याची भीती आहे. नद्यांची पाणी पातळी वाढली तर नदी काठी असणाऱ्या शेत जमिनीतील शेती पिकांचे व जनावरांचे देखील देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली, शेत मालाची व पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आव्हान जाणकारांनी केले आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास काल पासून सुरू झाला असून पश्चिम राजस्थान आणि कच्छ भागातून कालपासून मान्सून ने माघारी परतण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान परतीचा प्रवास आता सुरू झाला असल्याने महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा राज्यात परतीचा पाऊस मनसोक्त बरसण्याचे चिन्ह तयार होत आहेत. त्यामुळे जाता-जाता मान्सून हा महाराष्ट्राला चांगलाच दणका देणार असल्याचे दिसत आहे. म्हणून पुढील काही दिवस राज्यातील नागरिकांनी सतर्क असणे आवश्यक आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment